Thursday, June 5, 2014

राज्यपालांनी विधानपरिषदेवर १२ कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांना नामनियुक्त करू नये -किशोर तिवारी

राज्यपालांनी विधानपरिषदेवर १२ कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांना नामनियुक्त करू नये -किशोर तिवारी
नागपूर -५ जून २०१४

१० मार्चला विधान परिषदेचे राज्यपालांनी नियुक्त केलेले १२ आमदार निवृत झाले आहेत आता मात्र या ठिकाणी पुढील निवडणुकीच्या तयारीने राजकीय पुनर्वसन करण्यात येत असून ह्या होत असलेल्या सर्व नियुक्ता भारतीय घटनेच्या कलम १७१ पोट कलम ५ मध्ये दिलेल्या तरतुदीचा फाटा देणाऱ्या असून निवडणुकीमध्ये जनाधार गमावलेल्या सरकारने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून विधान परिषदेची गरीमा करणारा असून  महामहीन राज्यपालांनी या नियुक्ता करू नये अशी मागणी विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी एका निवेदनातून केली आहे . 
ज्या  सरकारने नियुक्ती केली आहे त्या सरकारला जनतेने नाकारले आणी नवीन सरकार आल्यावर नैतिकतेच्या आधारवर  सर्व  राज्यपाल आपला राजीनामा देत असत व महाराष्ट्राचे महामहीन राज्यपाल के शंकर नारायण हे   एक  गांधीवादी आदर्शवादी  सामाजीक  नेते आहेत त्यांचा राजीनामा अपेशीत होता मात्र बदलेल्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावरही झाले असल्याचे दिसत  आहे मात्र त्यांनी विधान परिषदेचे आमदार नियुक्तीवेळी आपला सतविवेक जागृत ठेवावा अशी अपेशा किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे . 

विधान परिषद मध्ये समाजातील साहित्य ,कला ,समाजसेवा व इतर क्षेत्रातील गणमान्य  व्यक्तींना  राजकीय पक्षांच्या राजकारणात व निवडणुकीच्या  समीकरणातून  सरकारच्या धोरणामध्ये सहभाग होणे कठीण  असल्यामुळे  भारतीय घटनेच्या कलम १७१-५ मध्ये राज्यपालांना १२  निशांत व्यक्तींना  नामनियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत मात्र गेल्या वर्षांत  ह्या तरदुतीचा सर्रास गैरवापर होत असून सर्व मार्गदर्शक तत्वे केराच्या टोपलीत टाकून राजकीय नेत्यांनाच नियुक्त करण्यात येत आहे आणी राज्यपाल सुद्धा याला विरोध न करता आपला हिसा टाकत हे दुर्भाग्य आहे अशी टीकाही तिवारी यांनी केली आहे . 

महाराष्ट्राचे महामहीन राज्यपाल के शंकर नारायण यांना ज्या १२ व्यक्तींची नावे सध्या चर्चेत आहेत ते तर  ठेकेदार व  पोटभरू राजकीय  जनतेनी नाकारलेले नेते असून त्यांचा  समाजातील साहित्य ,कला ,समाजसेवा व इतर क्षेत्रात कोणतेही काम नाही  करीता शंकर नारायण यांनी ही यादी नाकारावी व आपले नैतीक मुल्य दाखवावे असे आवाहनही किशोर तिवारी दिले आहे 

Tuesday, June 3, 2014

लोकनेते गोपीनाथ मुंडे निधनाने महाराष्ट्राचे पोरके झाले : आत्महत्यागस्त शेतकऱ्यांचे अपरिमित हानी -किशोर तिवारी

लोकनेते गोपीनाथ मुंडे निधनाने महाराष्ट्राचे शेतकरी पोरके झाले : आत्महत्यागस्त शेतकऱ्यांचे अपरिमित हानी -किशोर तिवारी 
दिनाक -३ जून २०१४ 
विदर्भ व मराठवाड्याच्या आत्महत्यागस्त शेतकऱ्यांना  आजचा सुर्योदय काळ रात्र घेऊन आला आपला  वाली महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री   लोकनेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाही आणि एका लढवय्या नेत्यांला आपण मुकलो यावर कोणाचाही विश्वास बसत नसून ज्या नेत्याने आम्हाला सुखीची दिवस आणण्याचे आश्वासन  दिले होते त्यालाच देवाने आम्हाच्यातून  फार दूर नेले हि आपदागस्र्त शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले  आहे आता आम्हाचा वाली गेला  अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विदर्भ जन आंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी  आपल्या शोक संवेदनेत व्यक्त केली  
जमीनीच्या प्रश्नाची जाण असणारे  बहुजन समाजाचा सर्वमान्य लोकनेता आज भाजप गमावला आहे . गोपीनाथ मुंडे  हे युतीच्या सरकारच्या विजयाचे सुद्धा शिल्पकार होते व लोकसभेच्या महायुतीच्या प्रचंड यशात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळेच नितीन गडकरी यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोबतच  मोदी सरकारमध्ये घेण्याचा धरला होता त्यांनी २००५ व २०१२ मध्ये काढलेल्या शेतकरी मोर्चे नागपूरची जनता व आघाडी सरकार ही विसरणार नाही . 
महाराष्ट्र टोल मुक्त करणार ,सातबारा कोरा करणार ,वीज बिल माफ करणार ,कापसाचा हमीभावाचा प्रश्न मोदी सरकारमध्ये मार्गी लावणार ह्या त्यांच्या घोषणा आजही शेतकऱ्यांच्या कानात घुमत आहेत  केंद्राचा मोदी सरकार व राज्यच्या येणाऱ्या सरकारने पूर्ण करावी हीच त्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशी मत तिवारी  व्यक्त केले .  विदर्भाचे शेतकरी महायुती सरकार  मोठ्या बहुमताने विजयी करून गोपीनाथ मुंडे यांचे  स्वप्न साकार करणार असा विश्वासही त्यांनी    व्यक्त केला .